Wednesday, 28 December 2022

आपके घर के सामने का पेड़ मेरे जैसा बड़ा हो गया है, अब आप में मेरी उपस्थिति के रूप में मेरे घर की ओर झुक रहा है।

Monday, 19 December 2022

ती बंद खोली कविता

ती बंद खोलीत . इकडे तिकडे भिरभिरत असते. एखाद्या चिमणी सारखी संकटाची जाणीव न झालेली. अभावितपणे खेळात सामील असते.. सैरभैर भिरभिरताना मध्येचं कुणाला तरी चुकून तिची चोच लागते.. ती प्रयत्न करते सावरण्यासाठी घाबरून आडोशाला जाते. कुणीतरी सुड बुद्धीने तिचे एक पीस खचकन उपटतो.. रक्ताचे थेंब ठिबकतात.. आणि बिचारी कळवते.. अन तीला एक एक संकटाची जाणीव व्हायला लागते.. आणि तथाकथित खेळ तिचे रक्त काढत राहतो.. ती जिवाच्या आकांताने खोली बाहेर उडू बघते.. पण दार बंद असते..

Sunday, 18 December 2022

सुधारित तंत्राने तूर लागवड उपाय

 सुधारित तंत्राने तूर लागवड *


तुरंगी पेरणी वेळेवर म्हणजेच कार्यंत होणे आवश्यक आहे. पेरणी कामाथी उशिरा याप्रमाणे उत्पादनात घट येते. यासाठी जास्तीत जास्त ७ जुलैपूर्वी करता येईल. तूर लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ व सेंद्रिय कर्ब ७.५% पेक्षा जास्त असावा. चोपण धारयुक्त जमीन मानवत नाही. 


बायकांना कशाला हवेत पौष्टिक लाडू? वजन वाढलं तर

  खास थंडीसाठी म्हणून घरोघट पौष्टिक लाडू केले जातात; पण बायका स्वतः मात्र खात नाहीत. स्वतःला दुय्यम समजून तब्येतीकडे दुर्लक्ष करणं हाच खरा प्रश्न आहे.                             दि नाहीत तोच बायकांना वेध लागतात हिवाळ्याचे पौष्टिक लाडू बनवायचे। थंडी चांगली पडायला लागली की घरोघर एकच चर्चा. झाले का लाडू करून?


किराण्याच्या यादीत लगेच डिंक, मेथी, काजू, बदाम, खारीक, खोबरे असे जिन्नस, साजूक तूप, गूळ " वगैरे जास्तीचं सामान मागवलं जातं. थंडी चांगली पडली की लगेच खारीक, खोबरं दळून आणलं जातं, डिंक तळला जातो, सुका मेवा बारीक होतो, काही घरांतून गव्हाचं पीठ किंवा उडदाच्या डाळीचं पीठ लाडूंमध्ये मिसळलं जाती अशी सगळी जय्यत तयारी होते. अगदी हौशीने वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे लाडू बांधले जातात. मोठमोठे डबे भरले जातात. याशिवाय कणकेचे, नाचणीचे, अळीवाचे असे अनेक प्रकारचे लाडू अनेक जणी हौसेने करतात.


मात्र खरी गंमत पुढेच आहे. इतक्या उत्साहाने लाडू बनवणाऱ्या किती स्त्रिया पुढे हिवाळ्यात हे लाडू खातात हा खरोखर संशोधनाचा विषय आहे. केल्या केल्या कसे झालेत हे बघण्यापुरता एखादा खात असतील हौसेने. पण रोज ठरल्यावेळी, ठरवून एक तरी लाडू किती जणी खातात? नवऱ्यासह मुलांच्या, 'वडीलधाऱ्यांच्या मागे लागतात की खा ते पौष्टिक लाडू, पण स्वतः? खात नाहीत! असं का तुम्ही का नाही छान पौष्टिक लाडू रोज खात, असं विचारलंच तर खूप मजेशीर कारणं सापडतात. मुळात त्यांच्या पोटात सापडतात. बायकांचे आपल्या तब्येतीकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष. हिमोग्लोबिन कमी असण्यापासून मान पाठ कंबरदुखी ते अनेक लहानमोठ्या आजार अनेक जण स्वत कङे दुलॅक्षच करतात 


विमा एक जोखीम

पहिला पगार झाल्यानंतर काय खर्च करायचा याविषयी तरुण जेवढे जागरूक असतात तेवढे आपली गुंतवणूक आणि आरोग्य विमा याविषयी फारच कमी जागरूक दिसतात. आपल्याला नेमका किती जीवन विमा घ्यायचा आहे याची माहिती नसताना अनेकवेळा विमा घेतला जातो. जो मॉलिसी विकली जाते ती घेतल्यावर अमुक वर्षांनी एवढे बक्कळ पैसे मिळतील अशा निव्वळ दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवून लोक विमा विकत घेतात. मुळात जीवन विम्याचा उद्देश त्यातून काही मोठा लाभ मिळेल असा नसतोच. Indeianity या विम्याच्या तत्त्वानुसार त्यातून फक्त जोखीम सुरक्षा देणे अपेक्षित असते. भारतात विकल्या जाणान्या विम्याच्या बहुतांश पॉलिसी या 'विथ प्रॉफिट' वा स्वरूपात असतात. समजा २० वर्षे कालावधीत एखाद्या माणसाने एक लाख रुपये मूल्याचा विमा घेतला असेल तर साधारण तितकाच हफ्ता वीस वर्षात एकूण विमा कंपनीला भरावा लागतो. २० वर्षांनी त्याला मूळ विमा रक्कम आणि बोनस मिळतो. पण २० वर्षांनी मिळणाऱ्या रकमेची खरी किंमत अथवा बाजारमूल्य फारच कमी असते. कारण महागाई आणि चलनवाढीचा प्रभाव मोठा होतो. याला पर्याय म्हणून प्युअर टर्म पॉलिसी घ्यावी. यात अत्यंत कमी किमतीत विमा मिळतो. एवढ्या कमी किमतीत विम्याचा मूळ उद्देश साध्य होतो. सुरक्षित भारतासाठी, सुरक्षित एक गैरसमज आहे. ट्रेडिंग करणारे करोत पण वस्तुस्थिती अशी आहे की ट्रेडिंग करणारे कितीही बाता मारोत, ते क्वचितच श्रीमंत होतात. कुटुंबासाठी आणि सुरक्षित नागरिकां होप साठी प्युअर टर्म प्लॅन म्हणजे अशा प्रकारचा विमा की ज्यात फक्त तुमचा मृत्यू झाला तरच त्याचा लाभ तुमच्या शार कुटुंबातील सदस्यांना मिळतो. यात दैनी फायदा असा की फक्त जोखीम कर सुरक्षा दिल्यामुळे विमा कंपनीला खर्च कमी असतो. आणि त्यामुळेच आणि त्याचा प्रिमियम कमी असतो. उदा. ३० वर्षाच्या एका तरुणाला २५ लाखाचे कवच गंधेरा हजाराच्या आसपास है। मिळते. (थोडे बदल होऊ शकतात) व्हा पारंपरिक लाभ देणाऱ्या विम्याचा कौन प्रिमियम एवढ्याच कवचासाठी फारच अन जास्त असतो. त्यामुळे विमा हा हाल फक्त टर्म स्वरूपात घ्यावा. विमा हा मुदतीपश्चात लाभ मिळण्यासाठी नसून फक्त आणि फक्त जोखीम सुरक्षा टांक म्हणून आहे. विम्याचा वापर करून प्रति मुलांच्या लग्नाच्या वेळी लागणारे पैसे एकदम मिळतील अशा प्रलोभनांच्या साहाय्याने घेणे फारसे व्यवहार्य नाही. विमा ही गुंतवणूक नाही. विम्याकडे गुंतवणूक म्हणून न पाहता एका जोखीमेची जबाबदारी म्हणून पाहिले गेले पाहिजे. विमा आणि गुंतवणूक हे आ विषय भिन्न आहेत. त्यांची एकमेकांशी गल्लत करू नका. सर्वात प्रथम तुमच्या व्य कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर आहे, बोल त्यानंतर गुंतवणूक वगैरे.

जगातील सर्वात महान तीर्थ

जगातील सर्वात महान तीर्थ ? आईची कूस. कारण या कुशीत स्वतः तीर्थंकर आणि अवतारी खेळले आहेत. प्रेम केव्हा रडते? ज्या दिवशी घराच्या अंगणात एक नवी भिंत उभी राहते, त्या दिवशी दोन भावांचे प्रेम लपून-छपून रडत असते. अश्वारूढ वराने वरातीत काय विचार करावा? हाच की, जे आज वरात घेऊन आले आहेत, तेच उद्या माझी तिरडीसुद्धा उचलणार आहेत. जर कोणी विश्वासघात केला, तर त्याला क्षमा करा; परंतु त्याचे नाव स्मरणात ठेवा.

सुखी जीवनाचे रहस्य

सुखी जीवनाचे रहस्य हे आहे की, जें तुमच्याजवळ आहे, त्याचा आनंद घ्या. जे नाही त्याचा ध्यास घेऊ नका. उदा. तुमच्याजवळ ९० रुपये आहेत तर त्याचा आनंद घ्या. १०० रुपयांना जे १० कमी आहेत त्याचे दुःख करू नका. १०० रुपये करण्याच्या भानगडीतही पडू नका, कारण १०० तर पूर्ण होणारच नाहीत, उलट असलेले ९० रुपयेही चालले जातील. सम्राट सिकंदरचेसुद्धा १०० पूर्ण झाले नाहीत मग तुम्ही कोणत्या शेताची मुळी आहात? तुम्ही तर मुळातच 'मामुली' आहात.

कङवा सच

अगर कोई मंदिर गिर जाए तो घबराने की कोई बात नहीं है। भले ही कोई मस्जिद गिर जाए हां-हमलों के साथ खिलवाड़ करने की जरूरत नहीं है। मंदिर-मस्...