Friday, 30 December 2022

कङवा सच

अगर कोई मंदिर गिर जाए तो घबराने की कोई बात नहीं है। भले ही कोई मस्जिद गिर जाए हां-हमलों के साथ खिलवाड़ करने की जरूरत नहीं है। मंदिर-मस्जिद सैकड़ों गुना हैं उठेगा और गिरेगा; लेकिन अगर इंसानियत का मंदिर टूट जाए तो उसे दोबारा बनाने की ताकत किसी में नहीं है। क्या मिट्टी, ईंट-चूने और सीमेंट की कीमत इंसानियत की ईंट, चरित्र के चूने और सच्चाई के सीमेंट से ज्यादा है?

Wednesday, 28 December 2022

आता मी सुद्धा ठरवलंय अगदी तुझ्यासारख वागायच तू हसलीस तर हसायच तू रुसलीस तर रुसायचं
तुझ्यासाठी जन्म घेतला तुझ्यासाचसाठी मरणार आहे तुझ्यावाचून माझ्या जीवनाला अर्थ तरी काय उरणार आहे.
जीवनातील सारी सुखद स्वप्ने ओंजळीने भरून घ्यावी कितीही आडवळणे आली तरी ती तुला भरभरून द्यावी..
रात्री माझ्या घरासमोर अंगण भरून चांदणं पसरल सकाळी पाखरांनी चिवचिवाट केला आणि चांदणं अंगणाला विसरलं.
कधी कधी माझ्यावर तुझ्या आठवणीचा मेघ परसतो वाट पाहणान्या डोळयांतून गालावरती हळूच थेंब उतरतो.
मगर होठों पर मुस्कान दिखनी चाहिए, दूर तक चले जो कदम मेरे लिए मुड़ें।
आपके घर के सामने का पेड़ मेरे जैसा बड़ा हो गया है, अब आप में मेरी उपस्थिति के रूप में मेरे घर की ओर झुक रहा है।

Monday, 19 December 2022

ती बंद खोली कविता

ती बंद खोलीत . इकडे तिकडे भिरभिरत असते. एखाद्या चिमणी सारखी संकटाची जाणीव न झालेली. अभावितपणे खेळात सामील असते.. सैरभैर भिरभिरताना मध्येचं कुणाला तरी चुकून तिची चोच लागते.. ती प्रयत्न करते सावरण्यासाठी घाबरून आडोशाला जाते. कुणीतरी सुड बुद्धीने तिचे एक पीस खचकन उपटतो.. रक्ताचे थेंब ठिबकतात.. आणि बिचारी कळवते.. अन तीला एक एक संकटाची जाणीव व्हायला लागते.. आणि तथाकथित खेळ तिचे रक्त काढत राहतो.. ती जिवाच्या आकांताने खोली बाहेर उडू बघते.. पण दार बंद असते..

Sunday, 18 December 2022

सुधारित तंत्राने तूर लागवड उपाय

 सुधारित तंत्राने तूर लागवड *


तुरंगी पेरणी वेळेवर म्हणजेच कार्यंत होणे आवश्यक आहे. पेरणी कामाथी उशिरा याप्रमाणे उत्पादनात घट येते. यासाठी जास्तीत जास्त ७ जुलैपूर्वी करता येईल. तूर लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ व सेंद्रिय कर्ब ७.५% पेक्षा जास्त असावा. चोपण धारयुक्त जमीन मानवत नाही. 


बायकांना कशाला हवेत पौष्टिक लाडू? वजन वाढलं तर

  खास थंडीसाठी म्हणून घरोघट पौष्टिक लाडू केले जातात; पण बायका स्वतः मात्र खात नाहीत. स्वतःला दुय्यम समजून तब्येतीकडे दुर्लक्ष करणं हाच खरा प्रश्न आहे.                             दि नाहीत तोच बायकांना वेध लागतात हिवाळ्याचे पौष्टिक लाडू बनवायचे। थंडी चांगली पडायला लागली की घरोघर एकच चर्चा. झाले का लाडू करून?


किराण्याच्या यादीत लगेच डिंक, मेथी, काजू, बदाम, खारीक, खोबरे असे जिन्नस, साजूक तूप, गूळ " वगैरे जास्तीचं सामान मागवलं जातं. थंडी चांगली पडली की लगेच खारीक, खोबरं दळून आणलं जातं, डिंक तळला जातो, सुका मेवा बारीक होतो, काही घरांतून गव्हाचं पीठ किंवा उडदाच्या डाळीचं पीठ लाडूंमध्ये मिसळलं जाती अशी सगळी जय्यत तयारी होते. अगदी हौशीने वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे लाडू बांधले जातात. मोठमोठे डबे भरले जातात. याशिवाय कणकेचे, नाचणीचे, अळीवाचे असे अनेक प्रकारचे लाडू अनेक जणी हौसेने करतात.


मात्र खरी गंमत पुढेच आहे. इतक्या उत्साहाने लाडू बनवणाऱ्या किती स्त्रिया पुढे हिवाळ्यात हे लाडू खातात हा खरोखर संशोधनाचा विषय आहे. केल्या केल्या कसे झालेत हे बघण्यापुरता एखादा खात असतील हौसेने. पण रोज ठरल्यावेळी, ठरवून एक तरी लाडू किती जणी खातात? नवऱ्यासह मुलांच्या, 'वडीलधाऱ्यांच्या मागे लागतात की खा ते पौष्टिक लाडू, पण स्वतः? खात नाहीत! असं का तुम्ही का नाही छान पौष्टिक लाडू रोज खात, असं विचारलंच तर खूप मजेशीर कारणं सापडतात. मुळात त्यांच्या पोटात सापडतात. बायकांचे आपल्या तब्येतीकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष. हिमोग्लोबिन कमी असण्यापासून मान पाठ कंबरदुखी ते अनेक लहानमोठ्या आजार अनेक जण स्वत कङे दुलॅक्षच करतात 


विमा एक जोखीम

पहिला पगार झाल्यानंतर काय खर्च करायचा याविषयी तरुण जेवढे जागरूक असतात तेवढे आपली गुंतवणूक आणि आरोग्य विमा याविषयी फारच कमी जागरूक दिसतात. आपल्याला नेमका किती जीवन विमा घ्यायचा आहे याची माहिती नसताना अनेकवेळा विमा घेतला जातो. जो मॉलिसी विकली जाते ती घेतल्यावर अमुक वर्षांनी एवढे बक्कळ पैसे मिळतील अशा निव्वळ दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवून लोक विमा विकत घेतात. मुळात जीवन विम्याचा उद्देश त्यातून काही मोठा लाभ मिळेल असा नसतोच. Indeianity या विम्याच्या तत्त्वानुसार त्यातून फक्त जोखीम सुरक्षा देणे अपेक्षित असते. भारतात विकल्या जाणान्या विम्याच्या बहुतांश पॉलिसी या 'विथ प्रॉफिट' वा स्वरूपात असतात. समजा २० वर्षे कालावधीत एखाद्या माणसाने एक लाख रुपये मूल्याचा विमा घेतला असेल तर साधारण तितकाच हफ्ता वीस वर्षात एकूण विमा कंपनीला भरावा लागतो. २० वर्षांनी त्याला मूळ विमा रक्कम आणि बोनस मिळतो. पण २० वर्षांनी मिळणाऱ्या रकमेची खरी किंमत अथवा बाजारमूल्य फारच कमी असते. कारण महागाई आणि चलनवाढीचा प्रभाव मोठा होतो. याला पर्याय म्हणून प्युअर टर्म पॉलिसी घ्यावी. यात अत्यंत कमी किमतीत विमा मिळतो. एवढ्या कमी किमतीत विम्याचा मूळ उद्देश साध्य होतो. सुरक्षित भारतासाठी, सुरक्षित एक गैरसमज आहे. ट्रेडिंग करणारे करोत पण वस्तुस्थिती अशी आहे की ट्रेडिंग करणारे कितीही बाता मारोत, ते क्वचितच श्रीमंत होतात. कुटुंबासाठी आणि सुरक्षित नागरिकां होप साठी प्युअर टर्म प्लॅन म्हणजे अशा प्रकारचा विमा की ज्यात फक्त तुमचा मृत्यू झाला तरच त्याचा लाभ तुमच्या शार कुटुंबातील सदस्यांना मिळतो. यात दैनी फायदा असा की फक्त जोखीम कर सुरक्षा दिल्यामुळे विमा कंपनीला खर्च कमी असतो. आणि त्यामुळेच आणि त्याचा प्रिमियम कमी असतो. उदा. ३० वर्षाच्या एका तरुणाला २५ लाखाचे कवच गंधेरा हजाराच्या आसपास है। मिळते. (थोडे बदल होऊ शकतात) व्हा पारंपरिक लाभ देणाऱ्या विम्याचा कौन प्रिमियम एवढ्याच कवचासाठी फारच अन जास्त असतो. त्यामुळे विमा हा हाल फक्त टर्म स्वरूपात घ्यावा. विमा हा मुदतीपश्चात लाभ मिळण्यासाठी नसून फक्त आणि फक्त जोखीम सुरक्षा टांक म्हणून आहे. विम्याचा वापर करून प्रति मुलांच्या लग्नाच्या वेळी लागणारे पैसे एकदम मिळतील अशा प्रलोभनांच्या साहाय्याने घेणे फारसे व्यवहार्य नाही. विमा ही गुंतवणूक नाही. विम्याकडे गुंतवणूक म्हणून न पाहता एका जोखीमेची जबाबदारी म्हणून पाहिले गेले पाहिजे. विमा आणि गुंतवणूक हे आ विषय भिन्न आहेत. त्यांची एकमेकांशी गल्लत करू नका. सर्वात प्रथम तुमच्या व्य कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर आहे, बोल त्यानंतर गुंतवणूक वगैरे.

जगातील सर्वात महान तीर्थ

जगातील सर्वात महान तीर्थ ? आईची कूस. कारण या कुशीत स्वतः तीर्थंकर आणि अवतारी खेळले आहेत. प्रेम केव्हा रडते? ज्या दिवशी घराच्या अंगणात एक नवी भिंत उभी राहते, त्या दिवशी दोन भावांचे प्रेम लपून-छपून रडत असते. अश्वारूढ वराने वरातीत काय विचार करावा? हाच की, जे आज वरात घेऊन आले आहेत, तेच उद्या माझी तिरडीसुद्धा उचलणार आहेत. जर कोणी विश्वासघात केला, तर त्याला क्षमा करा; परंतु त्याचे नाव स्मरणात ठेवा.

सुखी जीवनाचे रहस्य

सुखी जीवनाचे रहस्य हे आहे की, जें तुमच्याजवळ आहे, त्याचा आनंद घ्या. जे नाही त्याचा ध्यास घेऊ नका. उदा. तुमच्याजवळ ९० रुपये आहेत तर त्याचा आनंद घ्या. १०० रुपयांना जे १० कमी आहेत त्याचे दुःख करू नका. १०० रुपये करण्याच्या भानगडीतही पडू नका, कारण १०० तर पूर्ण होणारच नाहीत, उलट असलेले ९० रुपयेही चालले जातील. सम्राट सिकंदरचेसुद्धा १०० पूर्ण झाले नाहीत मग तुम्ही कोणत्या शेताची मुळी आहात? तुम्ही तर मुळातच 'मामुली' आहात.

माहीत आहे

सत्य माहीत आहे? पुरुषापेक्षा महिला अधिक काळ जगतात. आकडेवारी सांगते की, जगात विधुरांपेक्षा विधवा अधिक आहेत. कारण महिला समर्पणात जगतात आणि पुरुष ताठरपणात जगतात. जो ताठरपणे जगतो, तो लवकर खचतो. दात लवकर पडतात, जीभ नाही. हेही सत्य आहे की, वेड्यांच्या इस्पितळात महिलापेक्षा पुरुषांची संख्या अधिक आहे. कारण महिला रोज थोड्या-थोड्या वेड्या होतच असतात. दुःख झाले की रडतात; संताप झाला की मुलांना भारतात; पण मिशीची अब्रू राखण्यासाठी पुरुष रडू शकत नाही. तो दुःख आणि क्रोध आतल्या आत दाबत जातो आणि मग कधीतरी विस्फोट होतो आणि तो पूर्ण वेडा होतो. मग वेड्याच्या इस्पितळाशिवाय त्याला अन्यत्र स्थान नसते. त

Saturday, 17 December 2022

सत्य

कटू सत्य घरात इतर खोल्यांबरोबर एक शौचालयही असते. प्रत्येक व्यक्ती शौचालयात जितका वेळ देते, तितकाच वेळ प्रत्येक व्यक्तीने राजकारणात द्यायला हवा. खरे पाहू जाता जीवनात राजनीतीचे महत्त्व शौचालयापेक्षा अधिक असता कामा नये. कारण फ्रीजमध्ये अधिक वेळ ठेवलेले पाणी बर्फ होते. आणि राजकारणात अधिक काळ घालविलेला माणूससुद्धा अप्रामाणिक होतो.

उद्याची अर्थसृष्टी असाध्याची साधना

रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणारा माणूस एक तर भाबडा असतो नाही तर भामटा असतो. पण उज्वल भवितव्याचे स्वप्न पाहणे हे मनुष्य स्वभावाच्या उमदेपणाचे लक्षण आहे. रोजचा दिवस रोज उगवतो आणि उद्याचा दिवस रोज पुढेपुढे पळती. त्यामुळे उज्ज्वल भवितव्य कधी येणार हे रोज पडणारे स्वप्न राहते. निदान सामान्य माणसांच्या बाबतीत हे घडत राहते. बचत बचत अशी किती करायची ? आजच्या गरजा भागवून काही शिल्लक राहिले तर ती बचत. त्या बचतीला महागाईची कीड लागण्यापासून कसे वाचवायचे, हा प्रश्न नेहमीच आ वासून उभा असतो. असे म्हणतात की नकारात्मक विचारांनी केवळ नकार घंटेचाच गजर होत राहतो. पण सकारात्मक विचार करायचा असेल तर खोलात शिरावेच लागते. सामान्य माणसाला अर्थसृष्टी एखाद्या मृगजळासारखी भासते. पण दूरवर खरे तर एक सरोवर आहे, तिथे नंदनवन नसले तरी आनंदवन असू शकते.गुंतवणुकीसंबंधी काही मिथ्यांचा आणि तथ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. मिथ्य : शेअर बाजार हा सट्टेबाजांचा अड्डा आहे. तिकडे फिरकणे म्हणजे | दिवाळखोरीला निमंत्रण आहे. तथ्य : शेअर बाजार पारदर्शक नियमांनुसार चालणारी एक संस्था आहे, जिथे ग्राहकाला एखाद्या एखाद्या उद्योगाच्या मालकीचा काही भाग विकत घेता येतो किंवा आपल्याकडील एखादा भाग विकता येतो. कुठलाही उद्योग चालण्यासाठी दोन प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते. एक म्हणजे भागभांडवल (शेअर्स) आणि दुसरे म्हणजे कर्जभांडवल (लोन अथवा डेब्ट). कर्जभांडवलाचे मूल्य व्याजाच्या दरानुसार ठरते तर भागभांडवलाचे मूल्य त्या उद्योगाच्या नफा कमावण्याच्या क्षमतेवर ठरते. आपण विनाकारण नफा कमावण्याकडे संशयाने तर व्याज कमावण्याकडे आदराने पाहतो. वास्तविक पाहता कर्जाची परतफेड आणि व्याजाची फेड त्या त्या उद्योगाने कमावलेल्या | नफ्यातूनच होते. त्याचप्रमाणे शेअर गुंतवणुकीतील परतावा त्या उद्योगाने कमावलेल्या नफ्यातूनच मिळतो. फरक एवढाच की व्याजामध्ये एक व्याज मध्ये एक पकार करारपञातुन येणारी निश्रिती नसते तथ्य ही एक भाबडी समजूत आहे. बँकेत ठेव ठेवणे म्हणजे आपण बँकेला कर्ज देणे होय. बँकेत ठेव ठेवणे हा तात्पुरत्या गरज भागविण्याच्या दृष्टीने श्रेयस्कर उपाय आहे. पण त्यातून भांडवल संचय होईल असे आपण समजून चालता कामा नये. एकतर सतत होणाऱ्या भाववाढीमुळे बरेचसे व्याज आणि आपल्या देशाच्या बाबतीत मुद्दलाचा काही भाग यांचासुद्धा क्षय होतो. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गरजा भागविण्यासाठी बँकेत ठेव ठेवणे अपुरे आहे. मिथ्य: सोने घेऊन ठेवावे. त्यासारखी टिकाऊ गुंतवणूक नाही. तथ्य : सोने टिकाऊ आहे हे खरे आहे पण गुंतवणूक म्हणून फारसे उपयुक्त नाही. सोने हा एक अनुत्पादक बचतीचा प्रकार आहे. दागिना म्हणून ठेवले तर घडणावळ, मोडणावळ, लॉकरचा खर्च आणि | चोरीची भीती यासाठी तयार असावे लागते. अडचणीला वापरावे म्हटले तर असेल त्या भावाला आणि भरवशाच्या सोनाराला विकावे लागते, नाहीतर मारवाड्याकडे गहाण ठेवून अवाजवी व्याजाने पैसे उचलावे लागतात. गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून म्युच्युअल फंडांच्या काही युनिट स्कीम्सचा विचार करणे शक्य आहे. पण सोने घेऊन भविष्य निर्वाहाची योजना बनविता येणार नाही.

Thursday, 15 December 2022

मोबाईल फोन व आपण

मोबाईल फोन आणि आपण मोबाईल फोन उपकरण ही तुमच्यासाठी व महत्त्वाची वस्तू आहे. ती जपून वापरा. त्याची योग्य काळजी घ्या. • मोबाईल फोन उपकरणावर धूळ बसलेली असते. अनेक सूक्ष्म जीवजंतूंनी त्यावर घर केलेले असू शकते. त्यामुळे तो नित्यनेमाने स्वच्छ करा. मऊ फडक्याने किंवा टिश्यू पेपरने रोजच्या रोज पुसा. त्याला पाणी लावू नका, पण जरा दमट फडक्याने पुसला तरी चालू शकतो. पण त्यावर पाणी राहू देऊ नका. • मोबाईल फोन उपकरण शक्यतो कापडी, प्लास्टिकच्या किंवा चामडी कव्हरमध्ये ठेवा. त्यामुळे त्याला धक्का कमी नागतो आणि त्यावर घाण कमी बसते. ● मोबाईल फोन उपकरण हे खेळणे • नाही. ते उगाच कुठेतरी आपटत राहणे, र झेलत राहणे, त्याच्याशी चाळे करणे, यामुळे त्याचे आयुष्य कमी होते. • मोबाईल फोनची बॅटरी चार्ज करताना उपकरण बंद ठेवणे इष्ट. बॅटरी ठराविक वेळी, ठराविक कालावधीसाठी चार्ज करत ठेवा. किती वेळा, किती वेळासाठी हे तुमच्या उपकरणाच्या गरजेनुसार ठरवा. • खाताना, पावसातून चालताना मोबाईल फोन उपकरण शक्यतो वापरू नका. • पेट्रोल पंपावर किंवा अति उष्णता असलेल्या ठिकाणी मोबाईल फोन उपकरण वापरू नका. • कानाला हेडफोन लावून गर्दीच्या रस्त्यात चालणे किंवा रस्ता ओलांडणे टाळा. • आपले मोबाईल फोन उपकरण अन्य कोणाच्या हातात देताना जरा विचार करा. त्यात कितीतरी महत्त्वाचा डेटा असू शकतो. • सार्वजनिक वाहनाने म्हणजे बस, ट्रेनने प्रवास करताना आपल्या बोलण्याचा त्रास आजूबाजूच्यांना होत नाही ना, याकडे लक्ष द्या. तसेच सार्वजनिक ठिकाणी फोनवरून खाजगी संभाषण करताना सावध राहा. कुणी आपले बोलणे ऐकतेय का, ते टेप करतेय का, याबाबत जागरूक राहा. भान हरपून मोबाईलवर बोलत राहणे टाळा. • रात्री झोपताना मोबाईल फोन जवळ ठेवू नये. अलार्म लावण्यासाठी घड्याळ वापरता येते.

Sunday, 11 December 2022

कठोर परिश्रम घेतले तरच, यश तुमच्या पायाशी लोटांगण घालते.

नमस्कार मी अर्चना चव्हाण इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग या छोट्याशा गावातील रहिवासी माझी लहानपणापासून आणि कुटुंबियांनी पण इच्छा होती की शासकीय सेवेत रुजू व्हावे आणि त्यात शासकीय सेवा म्हणजे पोलीस होण्याचे मी माझे विद्यालयीन शिक्षण पूर्ण केले पोलीस भरतीची सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण देणारे संस्था कोणती याबद्दल मी शोध घेत होते अशातच मला नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणान्या आरती दामले यांच्याकडून अग्नि अकेडमी बद्दल माहिती मिळाली व क्षणाचा विलंब न करता अग्निपंख अकॅडमी मध्ये Enquiry ला गेले असता तिथे संचालक मा श्री गणेश धुमाळ सर यांनी मला योग्य असे मार्गदर्शन केल्यामुळे माझ्या शंकाचे निरसन झाले असता माझा अग्निपंख मध्ये प्रवेश निश्चित केला. परंतु मला एका अडचणीला सामोरे जावे लागले कारण दररोज इगतपुरी होऊन अॅकडमीला वेळेत येण्या जाण्याचे साधन उपलब्ध होत नसे अशा परिस्थितीत मी खूप ताश झाले होते परंतु सरांनी मला होस्टेलला राहण्याचे सुचविले असता मी तिथे राहण्याचा निर्णय घेऊन मी माझ्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली. परंतु काही कालावधीतच पोलीस भरती 2019 ची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि अशातच महाराष्ट्रात प्रस्थिती आणि त्यानंतर कोरोना सारख्या जागतिक महाभरकर महामारीने सर्व प्रकारच्या भरती प्रक्रिया रखडल्या गेल्या अशा परिस्थितीतही मी जिद न सोडता होस्टेलवर राहुन नियमित अभ्यास सुरू ठेवला अभ्यासात येणाऱ्या प्रत्येक शंकाचे निरसन सरांनी वेळोवेळी केली. दोन वर्षानंतर कोरोना परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर 2021 मध्ये पोलीस व अन्य भरती सेवा चालू करण्याचा शासनाने निर्णय घेतला असता मला खूप आनंद झाला. अशा वेळेस मी माझ्या मेहनतीचा वेग दुप्पट केला आणि माझ्या परिश्रमाला दुहेरी रूश मिळाले मी नंदुरबार शहर पोलीस साठी आणि नवी मुंबई चालक या दोन्ही ठिकाणी यश संपादन केले. सरांनी मला जे काही मार्गदर्शन केले हे अत्यंत मोलाचे होते त्यांच्या या मार्गदर्शनानेच मी हे यश संपादन करू शकले माझ्या यशात माझे सर्व माझ्या कुटुंबियांचे खूप मोठे सहकार्य लाभले. आज अग्निपंख अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन माझ्या जीवनाचे सार्थक झाले सरांच्या मार्गदर्शनाने असंख्य विद्यार्थी विविध पदावर आपले यश आजगावून बसले आहेत यापुढे असेच कायम निरंतर विद्यार्थी वश संपादन करीत राहतील. मी पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणान्या मुला मुलींना एवढेच सांगू इच्छिते की..... कदा प्रयत्न तर करा आकाशी उंच उडण्याचा. सुरवातीला येईल अनुभव अधून मधून पडण्याचा मग करा स्वतःला निर्भीड ध्यास धरा मागे न सरण्याचा!! ते पडणेच देईल कानमंत्र ध्येयासाठी जगण्याचा, यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत व त्याचबरोबर योग्य अशा मार्गदर्शनाची गरज असते. मला अग्निपंख अकॅडमी सारख्या सुसज्ज असे व्यासपीठ लाभले याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. कठोर परिश्रम घेतले तरच यश तुमच्या पायाशी लोटांगण चालते धन्यवाद!

Wednesday, 7 December 2022

प्रशासकीय सेवा... आता एका क्लिकवर

प्रशासकीय सेवा... आता एका क्लिकवर आपली समस्या, तक्रार, अर्ज, सूचना शासन दरबारी पोहोचावी, त्याची दखल घ्यावी अशी सामान्य नागरिकांची माफक अपेक्षा असते. परंतु आपल्या देशात तसे क्वचितच घडताना दिसते. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच 'आपले सरकार' हे वेब पोर्टल सुरू केले. या पोर्टलद्वारे सुरुवातीस ऑनलाइन तक्रार निवारण, सुशासनासाठी माझे सरकार, माहितीचा अधिकार आणि आता सेवा हमी कायद्यानुसार विविध सेवा देण्यासही सुरुवात झाली आहे. या सर्व सुविधा ऑनलाइन असल्याने, प्रत्येक बाबीची पोहोच मिळत असल्याने असल्याने आणि त्यांची सद्यस्थिती पाहता येत असल्याने त्याद्वारे केलेल्या अर्जांकडे दुर्लक्ष करणे आता सोपे राहिलेले नाही. शिवाय घरबसल्या सेवा मिळवणे शक्य झाल्याने दलालांच्या विळख्यातून नागरिकांची सुटका होईल अशी अपेक्षा आहे. 'आपले सरकार' पोर्टल संगणकावर वापरता येते त्याचप्रमाणे त्याचे अॅप मोबाईल फोनवरही इन्स्टॉल करता येते. या पोर्टलवरील चारही सुविधा वापरण्याची पद्धत वेगवेगळी आहे. सर्वात आधी हे लक्षात ठेवले पाहिजे की सर्व ऑनलाइन शासकीय संकेतस्थळे इंटरनेट एक्सप्लोरर या ब्राऊझर्समध्येच चांगल्या रीतीने उघडतात. या पोर्टलवरील काही सुविधांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करून पासवर्ड मिळवावा लागतो तर काही सुविधा मोबाईल क्रमांक किंवा ईमेलच्या आधारे एकदाच मिळणारा पासवर्ड वापरून मिळू शकतात. या सुविधांचा लाभ कसा घ्यायचा हे आता पाहूया. आपले सरकार पोर्टल वर https://aaplesarkar. maharashtra.gov.in/ या लिंकवरून जाता येते किंवा महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov. in/ या संकेतस्थळावरूनसुद्धा या पोर्टलवर जाता येते. त्यावर गेल्यानंतर सेवा हमी कायदा, तक्रार निवारण, माहितीचा अधिकार आणि माझे सरकार यापैकी आपल्याला हव्या असलेल्या पर्याय आपण निवडू शकता. सेवा हमी कायद्याअंतर्गत राज्य शासनाबरोबरच इतर ही काही सार्वजनिक प्राधिकरणे उदा. जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदा, महानगरपालिका यांच्या सेवादेखीले पोर्टलद्वारे प्राप्त केल्या जाऊ शकतात. यासाठी करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत ज्या सेवा पात्र व्यक्तींना दिल्या जातात त्या अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अगदी जन्मतारखेच्या दाखल्यापासून ज्येष्ठ नागरिकत्वाच्या दाखल्यापर्यंत तसेच अधिवासाच्या दाखल्यापासून जातीच्या दाखल्यापर्यंत अनेक सेवांचा समावेश आहे. मंत्रालयस्तरावरील १५६ सेवांशिवाय महापालिका स्तरावरील ६८ सेवांसह सुमारे २२४ सेवांचा लाभ या पोर्टलद्वारे घेण्याची सोय आहे. लोकसेवा हक्क अधिनियमानुसार तब्बल ३३ लाख ४५ हजार दोनशे बहात्तर अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ३१ लाख २५ हजार ९८ अर्ज निकाली काढण्यात आले. त्यामुळेच या कायद्याला महाराष्ट्राच्या बाबतीत माहिती अधिकार कायद्यानंतर आलेला सर्वात क्रांतिकारी कायदा असे म्हटले जाते. राज्याचे भवितव्य चांगल्या अर्थाने बदलण्याची क्षमता या कायद्यात आहे. पोर्टलशिवाय प्रत्यक्ष अर्ज करूनही या सेवांचा लाभ घेण्याची सोय आहे. त्यासाठी नागरिकांनी विहित नमुन्यात अर्ज केल्यानंतर संबधित सेवा देण्यासाठी नियुक्त केलेला पदनिर्देशित अधिकारी त्याची तात्काळ पोहोच ८. देतो. पदनिर्देशित अधिकाऱ्याने विहित कालावधीत सेवा न दिल्यास, अर्ज फेटाळल्यास किंवा अर्जाला उत्तर न व दिल्यास प्रथम व द्वितीय अपील आणि क सेवा हमी आयुक्तांकडे तृतीय अपील करता येते. पोर्टलद्वारे सेवा हमी कायद्यासाठी अर्ज केल्यानंतर एक टोकन क्रमांक दिला जातो व त्या क्रमांकाच्या आधारे अर्जदार आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासू शकतो. त्याचप्रमाणे अर्जदाराकडे असलेल्या प्रमाणित प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचीही सोय उपलब्ध आहे. या प्रणालीद्वारे मंत्रालयासह जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदांसह काही महापालिकांच्या बाबतीतही थेट ऑनलाइन तक्रार दाखल करता येते. अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीचे २१ दिवसांत निवारण करणे अपेक्षित आहे. याबाबत नागरिक 'समाधानी आहोत' किंवा 'समाधान झाले नाही' टल या दोन पर्यायांच्या माध्यमातून आपला माणे प्रतिसाद देऊ शकतात. 'समाधान झाले टॉल नाही' या पर्यायाची निवड केल्यास रही आपली तक्रार बंद केली जात नाही. 'आपले सरकार' पोर्टलद्वारे वले ऑनलाइन माहितीचा अधिकार कीय सुविधादेखील देण्यात आली आहे. या मंत्रालयीन स्तरावरील सर्व विभागांसह तीने काही महापालिका, जिल्हाधिकारी ही आणि काही जिल्हापरिषदा मिळन दणी राज्यातील सुमारे ८२ विभागांकडे या तर सुविधेदारे माहिती मागता येते तसेच विहित मुदतीत माहिती न मिळाल्यास • ऑनलाइन अपीलदेखील करता येते. त्याचप्रमाणे या प्रक्रियेसाठी लागणारे शुल्क ऑनलाइन भरता येते. त्यामुळे शासकीय यंत्रणांकडून घरबसल्या आवश्यक ती माहिती मिळवणे आता सोपे झाले आहे. 'माझे सरकार' ही आणखी एक सुविधा या पोर्टलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळेच नागरिकांचे प्रशासनातील सहभागाचे महत्त्व अधोरेखित होते. 'माझे सरकार'मध्ये नागरिकांना आपली मते मांडण्याची, सूचना देण्याची आणि निर्णय घेणाऱ्यांबरोबर संवाद साधण्याची सोय उपलब्ध आहे.त्यामुळे राज्यातील सरकार आपले म्हणणे . ऐकणारे आहे अशी भावना नागरिकांच्या मनात रुजवली जाऊ शकते. आगामी काळ डिजिटल असणार - आहे. वरील सुविधांशिवाय ई-लॉकर, ई-परवाना, ई-मोजणी, ई-भूलेख, ई-चावडी, ई-फेरफार, ई-ऑफिस, न ई-स्कॉलरशीप, ई-नकाशा यासारख्या ■ अनेक महाराष्ट्र शासनामार्फत ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या ■ जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनीही माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत साक्षर होण्याची गरज आहे. ऑनलाइन सुविधांचा लाभ घेण्यात अडचण आली तर नागरिक ०२२ ४०२९३००० या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

कङवा सच

अगर कोई मंदिर गिर जाए तो घबराने की कोई बात नहीं है। भले ही कोई मस्जिद गिर जाए हां-हमलों के साथ खिलवाड़ करने की जरूरत नहीं है। मंदिर-मस्...